Monday, August 16, 2010

आठवणी...

आज माझ्या कवितेला शब्द अपूरे आहेत...
आठवण-आठवण म्हणजे काय असंत.
शब्दाची ती अस्पष्ट साठवण असते...
आज हे क्षणही अपूरे आहेत...
म्हणूनच आयुष्य ही अपुरेच म्हणायचं
प्रत्येक क्षण-आठवण सांगणं सोप नसत
म्हणूनच 'शब्द'सुद्धा अधुरा असतो ...
अधुर्‍या आयुष्याकडे बघताना
अश्रू मात्र पूर्ण होतो...

म्हणूनच ही आठवण पुन्हा जाग्या होतात,
प्रत्येक क्षण-वेळ अधुरीही असेल
पण ते पूर्ण करणं आपल्या हाती नसत...
आठवणी हितगुज करतात म्हणूनच

त्या कधी हसवतात तर कधी त्या रडवतात...
अन् म्हणूनच आठवणी अतृप्त जीवनाकडे
आशेने बघण्याचं सांगत असावं...