Showing posts with label कोल्हापूर इचलकरंजी पुणे बस प्रवास. Show all posts
Showing posts with label कोल्हापूर इचलकरंजी पुणे बस प्रवास. Show all posts

Sunday, January 9, 2011

इचलकरंजी - पुणे बस


जरा कवितांना बाजूला ठेवून थोडे भावाचे प्रवास
वर्णन..

बऱ्याच दिवसांनी बसने प्रवास करण्याचा प्रसंग आला. तसा आता पेट्रोलच्या किंमती व टोलच्या लुटीमुळे तसा कार प्रवास अशक्य झाले आहे. त्यातच वयामानाने ड्रायव्हिंग करायला कंटाळा येतो.
पण काही कारणासाठी मिनचेस जावे लागले. जाताना कोल्हापूर सूपर एक्सप्रेस पकडली. झोपण्यामुळे जातानाचा प्रवास जाणवला नाही.येताना मात्र वडगावच्या छोट्या बस स्थानाकामुळे बसची भीती वाटत होती.

इचलकरंजी-पुणे बस आली. बसची अवस्था बघितल्यावर प्रवास रखडत होणार याची खात्रीच पटली. बरोबर गावाकडील नातेवाईक असल्याने कराड पर्यंत तरी कंटाळा येणार नव्हता. कराडपर्यंत जुन्या गोष्टीना उजाळा देत प्रवास उत्तम झाला. कराड नंतर करायच काय हा मोठा प्रश्न होता. पण गाडीत एका नजर टाकली आणि लक्षात आले की प्रवासात खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते आणि प्रत्येक जण आपआपल्या विश्वात रममान होते. प्रवास थोडी फार पु. लं. च्या 'म्हैस' आणि 'बॉम्बे टू गोवा' ची आठवण होत होती.

माझ्या पलिकडील खुर्चीवर अगदी काल परवा लग्न झालेले एका जोडपे बसलेले होते. सतत एकमेकांच्या खोड्या काढ, मधेच कानात गुजगोष्टी कर.

त्यांच्या समोर तीन चार बाकडें सोडून तीन लहान मुले असलेले गरीब कुटुंब बसलेले होते. ते सतत कन्नड मिश्रीत मराठीत गोंधळ घालत होते. त्याच्या वागण्यात एक मोकळेपणा होता. साताऱ्यात बस थांबली तेव्हा सर्वांनी घरुन आणलेला डबा, विकत घेतलले वडापाव, भजी मिटक्या मारत संपवले. पुढे साताऱ्या बाहेरील टोल नाक्यावर स्ट्रॉबेरी घेवून ती ही संपविली!!

त्यांच्या या मुक्त वर्तनामुळे त्यांच्या पलीकडे बसलेल्या पांढरपेशातील पन्नाशीतल गृहस्थ वैतागुन चुळबूळत होता. बहुतेक त्याला त्यांचा गरीब असून सहजपणा पटत नव्हता. एक दोनदा त्याने त्यांना दरडावण्याचा प्रयत्न केला, पण त्या कुटुंबाने बसच्या आवाजात त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले!

या सर्वांवर कहर म्हणजे दोन कॉलेज नुकतेच संपलेल्या मुली! माझ्या तीस पस्तीस वर्षाच्या लाल डबा प्रवासात एवढ्या फॅशनेबल (सूट होईल इतकच) मुली पाहिल्या नाही. एक सतत i-pod वर गाणे ऐकत होती तर दुसरी सतत मोबाइलवर गप्पा! त्यांच्या कला पाहून पुण्या पर्यंत नक्कीच बोअर होणार नाही याची खात्री पटली. पण त्यातील एक लवकरच उतरली.:(

साताऱ्यात रायगड जिल्ह्यातील काही शालेय मुलींचा गट चढला. बहुतेक कुठल्या तरी स्पर्धे साठी चालले असावे. त्यांचा चिवचिवाट, बोगदा आला की आरडाओरडात रुपांतरीत व्हायचा. सरांचा आवाज त्यांना थोड शांत करायचा. अर्थात सर, पुढें मॅडमशी शाळेतील राजकारण/समाज - गावकरी यावर गप्पा झोडत बसले होते.

एक मुस्लीम बाई मात्र या सर्वां पासुन अलिप्त होती. ती आणि तिची जागा .. कोणाला सहसा बसू दिले नाही.

बोचर्‍या थंडीत प्रथमच प्रवास संपू नये असे वाटत होते


copied from
http://prashantvpatil.blogspot.com/