Monday, August 16, 2010

आठवणी...

आज माझ्या कवितेला शब्द अपूरे आहेत...
आठवण-आठवण म्हणजे काय असंत.
शब्दाची ती अस्पष्ट साठवण असते...
आज हे क्षणही अपूरे आहेत...
म्हणूनच आयुष्य ही अपुरेच म्हणायचं
प्रत्येक क्षण-आठवण सांगणं सोप नसत
म्हणूनच 'शब्द'सुद्धा अधुरा असतो ...
अधुर्‍या आयुष्याकडे बघताना
अश्रू मात्र पूर्ण होतो...

म्हणूनच ही आठवण पुन्हा जाग्या होतात,
प्रत्येक क्षण-वेळ अधुरीही असेल
पण ते पूर्ण करणं आपल्या हाती नसत...
आठवणी हितगुज करतात म्हणूनच

त्या कधी हसवतात तर कधी त्या रडवतात...
अन् म्हणूनच आठवणी अतृप्त जीवनाकडे
आशेने बघण्याचं सांगत असावं...

No comments:

Post a Comment